राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघ राैप्यपदकाचा मानकरी
उज्जैन दि.०८ :- उज्जैन येथे आयोजित राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या अंतिम फेरीमध्ये महाराष्ट्र संघाने सांघिक गटात रौप्य पदक मिळविले. महाराष्ट्र संघाने ५०५.०७ गुणांसह राैप्यपदक तर यजमान मध्य प्रदेश संघाने ५०७.२० गुणांसह सुवर्णपदक जिंकले.
माता रमाई यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्ष रिपाइंतर्फे साजरे करणार -रामदास आठवले
राष्ट्रीय खेळाडू शार्दूल जाेशी, दर्शन, रणवीर माेहिते, वेदांत शिंदे, ऋषभ, मृगांक पाथरे, श्रेया सपकाळ, समीक्षा सुरडकर, प्रणाली माेरे, तनुश्री जाधव आणि आकांक्षा बरगे यांचा संघात समावेश होता.
‘गोबेल्स नीती’चा अवलंब करणा-या ‘बीबीसी’ला धडा शिकवावा- अभय वर्तक
मुख्य प्रशिक्षक रवी कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने हे यश मिळविले. आता महाराष्ट्राच्या ऋषभ, शार्दूल, समिक्षा आणि तनुश्री यांना वैयक्तिक गटात सुवर्णपदकाची संधी आहे.