ठळक बातम्या

मुंबईतील कोळीवाड्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.०८ :- कोळीवाडे हे मुंबईचे वैभव असून कोळी बांधवांची संस्कृती जपण्यासाठी, ती वाढविण्यासाठी आणि अनेक वर्षे मुंबईत राहणाऱ्या कोळी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कोळीवाड्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांसाठी १२० मीटरचा ‘नेव्हीगेशन स्पॅन’ कायमस्वरूपी मिळवून दिल्याबद्दल वरळी कोळीवाडा येथे मच्छिमार बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र संघ राैप्यपदकाचा मानकरी

त्यावेळी ते बोलत होते. कोळी बांधव हा दर्याचा राजा आहे. मासेमारी करताना बोटींना अडचण निर्माण होईल यासाठी सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या दोन खांबांमधील अंतर वाढविण्याची रास्त मागणी त्यांनी केली होती, शासनाने ती मान्य करून दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोळीवाड्यांचा विकास व्हावा, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी खाद्य महोत्सव आयोजित करणे, पर्यटनदृष्ट्या विकास करणे आदी निर्णय घेण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

माता रमाई यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीवर्ष रिपाइंतर्फे साजरे करणार -रामदास आठवले

मच्छिमार बांधवांचे जीवन सुकर व्हावे आणि कोळीवाड्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा हे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोळीवाड्यांच्या विकासाचा मास्टरप्लॅन तयार करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री आशिष शेलार, विजय शिवतारे, स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *