कचऱ्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा पुढाकार
अंबरनाथ येथे ५० एकर जागेवर प्रकल्प उभारणार
ठाणे दि.०६ :- अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि उल्हासनगर येथील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. कचऱ्याच्या शास्त्रोक्त आणि योग्य विल्हेवाटीसाठी प्रादेशिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणार आहे. १०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या विकासासाठी आणि संचलनासाठी निविदा मागविण्यात आल्या असून निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली जाणार आहे.
डोंबिवली ब्राह्मण उद्योजक समूहाच्या व्यावसायिक डिरेक्टरीचे प्रकाशन
बदलापूर, अंबरनाथ, कुळगाव आणि उल्हासनगर क्षेत्रातील घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अंबरनाथ येथे अंदाजे ५० एकर जागेवर सामाईक भरावभूमी विकसित करणे आणि ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे अशी कामे या प्रकल्पाअंतर्गत केली जाणार आहेत.
वीज उद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांविषयी बैठक आयोजित करावी
कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जावी आणि हे करताना पर्यावरणाला धक्का पोहोचू नये, प्रदूषण होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसेच यापुढे ‘एमएमआरडीए’मध्ये असे आणखी प्रकल्प उभे केले जाणार आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा निर्णय यापूर्वी अनेक वर्षांपूर्वी घेण्यात आला आहे. मात्र आतापर्यंत हा प्रकल्प मार्गी लागलेला नाही. तांत्रिक अडचणी आणि इतर कारणांनी रखडलेला हा प्रकल्प आता मात्र लवकरच मार्गी लागणार आहे.