मुंबईत स्मार्ट वीज मीटर, बेस्ट प्रशासनाचा निर्णय
मुंबई दि.२७ :- वीज वितरण व्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी मुंबईत स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येणार आहेत.
सीमाप्रश्नाचा ठराव मंजूर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणातील कॉंग्रेसच्या उल्लेखाने विरोधकांचा गदारोळ
सध्या या स्मार्ट मीटरची चाचणी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, बेस्टच्या १० लाखांहून अधिक ग्राहकांचे जुने मीटर बदलावे लागणार आहेत. या मीटरचे कार्य स्वयंचालित पद्धतीने चालणार आहे.
पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी कडोंमपा प्रयोगशाळा उभारणार
स्मार्ट मीटर थेट विद्युत विभागाच्या नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. स्मार्ट मीटरचा सर्वाधिक फायदा वीज चोरी, वीज गळती रोखण्यासाठी होणार असून वीज ग्राहकांनाही वीज वापराची अचूक माहिती मिळणार आहे.