१ लाख ६५ हजारांहून अधिक मुंबईकरांनी पाणीपट्टी थकविली

मुंबई दि.१६ :- गेल्या पाच वर्षांत पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्या किंवा ती थकविवणाऱ्या जलजोडणीधारकांची संख्या तब्बल १ लाख ६५ हजार ३६१ असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

बेपत्ता महिलांच्या तपासासाठी स्वतंत्र समिती स्थापन करून शोधमोहीम राबवावी- रुपाली चाकणकर

२०१९-२०मध्ये २१ हजार ७१० जणांनी पाणी देयक वेळेत भरले नव्हते. तर २०२३-२४मध्ये हीच संख्या ९४१ आहे. पाण्याचे देयक एका महिन्यात भरणे बंधनकारक आहे. मात्र दिलेल्या मुदतीत देयक न भरल्यास देयकाच्या रकमेवर दर महिन्याला दोन टक्के आकारणी केली जाते.

वांद्रे-वर्सोवा सीलिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे- उपमुख्यमंत्री फडणवीस

या अतिरिक्त आकारातून जल जोडणीधारकांना विशेष सवलत देण्यासाठी २०१९-२०पासून अभय योजना २०२० सुरू करण्यात आली. या योजनेला चांगला प्रतिसाद मुंबईकरांनी दिला असला तरी पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.