प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीची स्थापना
मुंबई दि.१२ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केली असून प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल
१७ सदस्यांच्या या समितीत विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आणि इतरांचा समावेश आहे.
