झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घुसखोरी टाळण्यासाठी वितरीत केलेली प्रत्येक सदनिका आधारकार्डशी जोडणार
मुंबई दि.१९ :- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घुसखोरी टाळण्यासाठी राज्य शासनाने या योजनेत वितरीत केलेली प्रत्येक सदनिका आधार कार्डाशी जोडण्याचे ठरविले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत आतापर्यंत एकूण दोन हजार २२ इरादा पत्रे जारी झाली आहेत.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत विधि महाविद्यालय सुरू
याअंतर्गत पाच लाख ५१ हजार २१० पुनर्वसन सदनिका मंजूर झाल्या असून आतापर्यंत दोन लाख ५४ हजार ६११ सदनिकांना निवासयोग्य प्रमाणपत्र जारी झाले आहे. या पैकी १३ हजार सदनिकाधारक हे मूळ झोपडीवासीय नसल्याचे आढळून आले आहे.