जैन समाजाची समाजाप्रती लोककल्याणकारी भावना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.११ :- जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज असून संकटप्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची असलेली लोककल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत श्री नयपद्मसागर सुरीश्वरजी महाराज यांना आचार्य पद प्रदान महा-महोत्सव कार्यक्रम आज मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे झाला.
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहरातील पाणी पुरवठा मंगळवारी बंद
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव तसेच देश-विदेशातील संत आणि जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प घोषित केला असून यात सर्व लोकांच्या प्रगती आणि उन्नतीचा विचार करण्यात आला आहे.
खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात, सांगण्याची गरज काय ?
या अर्थसंकल्पात गो-सेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्रसंत नयपद्मसागर यांना प्रदान करण्यात आलेली आचार्य ही पदवी असली तरी हे पद एक तपश्चर्या आहे. आचार्य बनण्यासाठी तप करावे लागते. राष्ट्रसंत नयपद्मसागर केवळ संत नसून एक विचार आहेत. ते समाजाला संघटीत करून पुढे नेत आहेत.