कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा शहरातील पाणी पुरवठा मंगळवारी बंद
कल्याण दि.११ :- कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या १४ मार्च रोजी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदी काठच्या बारावे, मोहिली, नेतिवली, टिटवाळा जलशुध्दीकरकण केंद्र आणि मोहने येथील उदंचन केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो.
खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात, सांगण्याची गरज काय ?
या केंद्रांमध्ये विद्युत, यांत्रिकी देखभाल दुरुस्तीचे काम करायची असल्याने १४ मार्च या दिवशी या चारही जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि टिटवाळा परिसरातील नागरिकांनी पुरेसा पाणी साठा करुन ठेवावा. मंगळवारी दुरुस्तीचे काम होणार असल्याने बुधवारी काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे, असे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कळविले आहे.