शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयांत पीकविमा काढता येणार- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई दि.०९ :- शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीकविमा काढता येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. तसेच शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये देण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस बोलत होत.
विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांचा अभिमान- मुख्यमंत्री शिंदे
आधीच्या योजनेनुसार पिकविम्याच्या हप्त्याची दोन टक्के रक्कम शेतकर्यांकडून घेतली जात होती. मात्र, आता पिकविम्याच्या हप्त्याचा कोणताही भार शेतकर्यांवर लादला जाणार नाही. शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकविमा काढता येईल. यासाठी ३३१२ कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
केंद्र सरकारकडून दरवर्षी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या मदतीत राज्य सरकार आपली ६ हजार रुपयांची भर घालून ही रक्कम देणार असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, हवामान बदल, अवकाळी पाऊस, अवर्षण अशा असंख्या समस्यांनी शेतकरी त्रासला असून शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले, तरी त्याला हक्काच्या मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी कायम उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे.
राष्ट्रवादीच्या टाळीला भाजपची साथ – शेखर जोशी
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी आगामी तीन वर्षात ३० टक्के वीज वाहिन्यांचे सौरउर्जेत रुपांतर करण्यात येणार आहे. याचा सुमारे ९.५० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पंतप्रधान कुसूम योजनेतून पुढील वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना कृषीपंप देण्यात येतील. प्रलंबित ८६ हजार कृषी पंपधारकांना तात्काळ वीज जोडण्या देण्यात येणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.