शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
मुंबई, दि. ७
राज्यात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यसचिव, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश. महसूल यंत्रणेला दिले.
प्रतिभेला कौशल्य आणि ज्ञानाची जोड मिळाल्यास कोणत्याही वयात प्रगती शक्य- राज्यपाल बैस
ठाणे, पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.
संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी
—–