देशातील क्षयरोग रुग्णांच्या संख्येत १८ टक्के घट- केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि. २९ :- देशात यावर्षी क्षयरोग रूग्णांच्या संख्येत १८ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. देशातील क्षयरोग २०२५ पर्यंत संपुष्टात आणणे हे केंद्रीय आरोग्य विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
परदेशातून आलेले दोन प्रवासी करोनाबाधित
त्यामुळे या प्रकल्पाअंतर्गत क्षयरोग निर्मूलन प्रकल्प हाती घेण्यासाठी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने केंद्रीय क्षयरोग विभाग, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांसोबत सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. भारतातील मोठ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या सध्या अधिक आहे.