शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभागाची कडक कारवाई – धनंजय मुंडे
मुंबई दि.२६ :- शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभाग कडक कारवाई करत आहे. आत्तापर्यंत तीन कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून यापुढेही अशी कारवाई सुरुच राहील, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
गणेशोत्सव मंडळांसाठी ‘एक खिडकी’ सुविधा – १ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन अर्ज
खते, बियाणे, किटनाशक कंपन्यांचे साटेलोटे आहे, या कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत. बोगस बियाणामुळे पीक उगवत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाते, आर्थिक नुकसानही होते. पण शेतकऱ्यांच्या तक्रारीही घेतल्या जात नाहीत.
पत्रकार सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल होणार
यातून शेतकरी उद्ध्वस्थ होतो व आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो, असे कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी कृषी विषयावरील चर्चेवर बोलताना सांगितले. या चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री मुंडे यांनी उपरोक्त उत्तर दिले.
