महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर
मुंबई दि.२७ :- महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर ‘उद्योग रत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली.
मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शाश्वत आनंदप्राप्तीसाठी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक – मिल्की अग्रवाल
हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरील असणार आहे. या पुरस्कारासह महिला, मराठी उदयोजक आणि अन्य एक उद्योजक असे तीन पुरसकार देण्यात येणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.
