इरशाळवाडी दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू; येथील रहिवाशांचे अन्यत्र स्थलांतर करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२१ :- इरशाळवाडी दुर्घटनेत २० जण मृत्युमुखी पडले असून आतापर्यंत ११९ जणांना वाचविण्यात यश आले आहे. दूर्घटनेत वाचलेल्या कुटुंबाचे पूनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी काही जागांची पाहणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका निवेदनाद्वारे आज विधानसभेत दिली.
मंत्री गिरीश महाजन यांचे विशेष काम आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुंबईत राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली. घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटी रुपयांची फसवणूक
राज्य सरकारच्या यंत्रणेसोबत स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बचत कार्यात मदत केली. गुरूवारी दिवसभरात एकूण ११९ लोकांना वाचविण्यात यश आले. नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहे. सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
