कल्याणमध्ये औदुंबर सोसायटीत रहिवाशांचा भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात मनपेकडे आक्रोश
सचिन शिंदे
कल्याण: औदुंबर प्रसाद सोसायटीच्या रहिवाशांनी मागील तीन महिन्यांपासून सोसायटीत घुसलेल्या दोन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
रहिवाशांनी पत्रात म्हटले आहे की —
-
एका पायाने अपंग असलेल्या महिलेवर कुत्र्याने झेप घेतल्याने त्या पडल्या व त्यांना उपचार करावे लागले.
-
ज्येष्ठ महिला व मुलांना वारंवार कुत्र्यांमुळे भीतीचा सामना करावा लागत आहे.
-
शिकवणी वर्गाला येणाऱ्या बारा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही या उपद्रवामुळे धास्ती वाटते.
महानगरपालिकेने कुत्रे पकडण्याचा प्रयत्न केल्यावर काही प्राणीप्रेमींनी (विशेषतः सोसायटीतील रहिवासी व त्यांच्या समर्थक) विरोध करून गाडी परत पाठवली. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर झाला आहे.
रहिवाशांचे म्हणणे आहे की :
-
“कुत्र्यांचे लसीकरण झाले असले तरी त्यांची भीती कमी होत नाही.”
-
“या कुत्र्यांचे कायद्याने रीलोकेशन नसेल तर शेल्टर होममध्ये पुनर्वसन करावे.”
सोसायटीतील नागरिकांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे की हे भटके कुत्रे तातडीने सोसायटीतून हटवावेत आणि अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
