ठळक बातम्या

पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार नाही – उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण

मुंबई दि.२६ :- मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिले. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने ३ हजार पदे भरण्याच्या सरकारच्या निर्णयाचे विधानपरिषदेत पडसाद उमटले. या निर्णयावरून विरोधी आमदारांनी सरकारला फैलावर घेतले. कंत्राटी भरतीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

अपात्रेसंदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ

सरकारने यावर निवेदन करण्याचा निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कंत्राटी पोलीस भरतीचा सरकारचा निर्णय धोकादायक आहे. तो त्वरित मागे घ्यावा. पोलीस हे सरकारच्या अखत्यारीतच असले पाहिजेत, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेतर्फे मुंबई ते कुडाळदरम्यान १८ अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाडय़ा

मुंबई पोलीस आणि राज्याच्या दृष्टीनेही हा प्रश्न महत्वाचा आहे. ११ महिन्यांसाठी भरती केल्यानंतर गुंडाना पोलिसांचा धाक कसा राहिल? असा प्रश्न काँग्रेसच्या भाई जगताप यांनी उपस्थित केला. अखेर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर उत्तर देताना कंत्राटी पद्धतीने पोलिसांची भरती केली जाणार नाही असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *