महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची सोमवारी मुंबईत बैठक
मुंबई दि.२७ :- मंगळवारपासून सुरू होणा-या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (३०) राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलाविली आहे. मात्र मंगळवारी अधिवेशनाला सुरूवात होत असताना सोमवारी बैठक आयोजित केल्याबद्दल खासदारांनी आक्षेप घेतला आहे.
घरांच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी म्हाडाकडून येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
संसद अधिवेशनात केंद्राकडे प्रलंबित राज्याशी सबंधित विविध प्रश्नांवर सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवावा आणि या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी केंद्राकडे प्रलंबित विषयांची- प्रश्नांची संसद सदस्यांना कल्पना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशा बैठकीचे आयोजन करण्याची प्रथा आहे. राज्यातील विविध विभागांचे प्रकल्प केंद्राच्या परवानगीच्या प्रतीक्षेत अडकून पडले आहेत. तसेच अनेक प्रकल्प, योजनांना केंद्राकडून मिळणारा निधी रखडलेला आहे.
उर्फी जावेद विचारतेय, कुणी घर देता का घर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण आणि वनविभागाची मान्यता, सिंचन प्रकल्पांना केंद्राची मान्यता आणि निधी, महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्राची भूमिका आदि राज्याशी संबंधित मात्र केंद्राकडे प्रलंबित प्रश्नावर सर्वपक्षीय खासदारांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याबाबत खासदारांना विनंती करण्यात येणार आहे. शिवसेनेतील फाटाफुटीनंतर राज्यातील खासदारांची होणारी ही पहिलीच बैठक आहे. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाचे खासदार सहभागी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.