मध्य रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांकडून १०० कोटी ३१ लाख रुपये दंड वसूल
मुंबई दि.०१ :- मध्य रेल्वेने एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत विना तिकीट प्रवाशांकडून मुंबई विभागात १०० कोटी ३१ लाख रुपये दंड वसूल केला आहे. एकूण १८.०८ लाख प्रवासी लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये तिकिटांशिवाय प्रवास करताना पकडले गेले. मध्य रेल्वेने या प्रवाशांकडून १००.३१ कोटी रुपये दंड वसूल केला.
होळीनिमित्त मध्य रेल्वेच्या दहा विशेष गाड्या
गेल्या आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये मध्य रेल्वेने १२.०३ लाख प्रवाशांकडून सुमारे ६१.६२ कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता, आकडेवारीनुसार, एसी लोकल ट्रेनमध्ये २५,००० प्रवासी विना तिकीट प्रवास करताना पकडले गेले. त्यांच्याकडून रेल्वेने ५.०५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.
उन्हाची तीव्रता आणखी वाढणार, दिवसा उकाडा आणि रात्री थंडी, काळजी घेण्याचे आवाहन
यापूर्वी, मध्य रेल्वेने २०१९-२० या आर्थिक वर्षात विना तिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर मध्य रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या १५.७३ लाख लोकांकडून ७६.८२ कोटी दंड वसूल केला होता, जो या आर्थिक वर्षात मोडला गेला.