उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुट्टी

मुंबई दि.२१ :- उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सुट्टीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळच्या अथवा संध्याकाळच्या सत्रात घ्यावेत. तथापि यासाठी नववी, दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना बोलाविण्यात येऊ नये.

शिवसेनेतर्फे ‘१० वी, १२ वी नंतर काय?’ या विषयावर २३ एप्रिलरोजी व्याख्यान

इतर विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा बोजा न टाकता त्यांना सुट्टीचा आनंद उपभोगू द्यावा, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, मराठी भाषा सक्ती इयत्ता सहावी पासून करण्यात आली आहे.

पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने सहभागी व्हावे पर्यावरण प्रधान सचिव प्रवीण दराडे

तथापि करानाचा काळ असल्याने यावर्षी आठवीत शिकत असलेले विद्यार्थी मराठी भाषा विषय पहिल्यांदाच शिकत आहेत. त्यामुळे २०२२-२३ च्या आठवीच्या विद्यार्थ्यांना २०२४-२५ या वर्षी दहावीपर्यंत एक वेळची बाब म्हणून मराठी विषयाच्या परीक्षेचे श्रेणीमध्ये रूपांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहितीही केसरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.