मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस
महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात मान्सून सक्रीय
मुंबई, दि. २५
मुंबईसह रायगड जिल्ह्यात येत्या २६ ते २८ जून या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही पुढील पाच दिवस पाऊस असणार आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात मान्सून सक्रीय झाला आहे.
रत्नागिरीत २४ ते २६ जून या तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तर सिंधुदुर्गात २४ जून रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
—–
