ठळक बातम्या

सहकार मंत्रालयामुळे सहकार चळवळीला नवसंजीवनी – अमित शाह यांचे प्रतिपादन

मुंबई दि.२४ :- सहकार चळवळ कालबाह्य झाली नसून, सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी येथे केले. मुंबई विद्यापीठ व सहकार भारती यांनी आयोजित केलेल्या ‘लक्ष्मणराव इनामदार स्मृति व्याख्यान मालेत’ शाह ‘आजच्या संदर्भात सहकारी चळवळ’ या विषयावर बोलत होते.

ठाणे, रायगड जिल्ह्यांना २७ सप्टेंबरपर्यंत यलो ॲलर्ट

मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या व्याख्यानमालेला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी, सहकार भरतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकुर आदी उपस्थित होते. सन २०१४ पर्यंत देशातील ६० टक्के लोकांकडे बँकेचे खाते नव्हते व ते अनौपचारिक अर्थव्यवस्थेशी जोडले होते. आज या ६० टक्के लोकांकडे बँकेची खाती आहेत, घर आहे, वीज, पाणी तसेच पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले

देशातील प्रत्येक व्यक्तीला अर्थवव्यवस्थेशी जोडायचे असेल तर सहकार हा एकमेव मार्ग असल्याचे शाह यांनी सांगितले. साखर व दूध या क्षेत्रांशिवाय सहकाराच्या माध्यमातून राज्यात मधाची गावे विकसित केली जात असून केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयामुळे देशाची अर्थव्यवस्था १० ट्रिलियन डॉलर इतकी होईल, असा विश्वास राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *