राज्य सरकारचा निषेध करत विरोधी पक्षांचा सभात्याग
मुंबई दि.२० :- शेतकऱ्यांच्या प्रश्नासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सरकार असंवेदनशीलपणे हाताळत असल्याचा आरोप करुन विरोधी पक्ष सदस्यांनी विधानसभेत आज सभात्याग केला. अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी संकटात असून सरकारी कर्मचारीही संपावर आहेत, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम ठप्प झाले आहे, असे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले, शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही.
छेडानगर येथील उड्डाणपुलाचे काम पूर्ण; मानखुर्द ते ठाणे हा प्रवास अधिक वेगवान
राज्यातील अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकरी असा दुहेरी कोंडीत अडकला असताना, सत्ताधारी पक्षाचे आमदार ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्याकडे हरामची कमाई आहे, अशी वादग्रस्त विधाने सत्ताधारी आमदार करत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे, मात्र राज्यातला बळीराजा संकटात असताना त्याला दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त भागातल्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचे भावनिक आवाहनही पवार यांनी केले.
