राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई दि.२५ :- ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
अंधेरी येथील महाकाली मार्गावर दरड कोसळली; १६८ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले
पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार बोलत होते.
दहिसर ते मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन येथे जागा
अधिवेशनात एकूण ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळासमोर मांडण्यात आल्या. याचा प्रत्यक्ष निव्वळ भार ३५ हजार ८८३ कोटी ३१ लाख इतका असल्याचेही त्यांनी सांगितले.
