समरसता प्रस्थापित करण्यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा- आरिफ मोहम्मद खान

ठाणे दि.१३ :- समरसता प्रस्थापित करण्यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे. समाजातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ‘महिलांना समान न्याय मिळण्यासाठी’ हा कायदा प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आणि ज्येष्ठ विचारवंत आरिफ मोहम्मद खान यांनी येथे केले.
प्रतिबंधित प्लास्टिकच्या विरोधात महापालिका प्रशासनाची २१ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ‘समान नागरी कायदा कशासाठी आणि कसा?’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, कोषाध्यक्ष अरविंद रेगे, कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य सुजय पतकी व्यासपीठावर होते.
ह्युंदाई’ कंपनी पुण्यात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार- उदय सामंत
या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही धर्मात-पंथात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही, कोणत्याही धर्मावर संकट न येता सर्वांचे धर्माधिकार अबाधितच राहतील. तिहेरी तलाक संबंधित कायदा लागू होतानाही विविध प्रकारचे हितसंबंध असणाऱ्या स्वार्थी घटकांनी असाच विरोध आणि बुद्धिभेद केला होता. मात्र हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाच्याही धार्मिक अधिकारांवर गदा आली नाही, उलट तलाकचे प्रमाण सुमारे ९५ टक्क्यांनी कमी होऊन असंख्य महिलांचे आणि परिवारांचे जीवनमान सुधारले. असे खान यांनी सांगितले.

rajesh

Recent Posts

कल्याण में धूमधाम से मनी महाराजा अग्रसेन जयंती

कल्याण। अग्रवाल समाज कल्याण समिति ने अपने कुलगुरु महाराजा अग्रसेन की 5179वीं जयंती का भव्य…

4 weeks ago

कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, सात आरोपींना अटक

कल्याण: कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची…

1 month ago

रासरंग २०२५: डोंबिवलीत शारदीय नवरात्रोत्सवाचा थाटामाटात होणार शुभारंभ

डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला 'रासरंग' शारदीय…

1 month ago

१७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंतीला राष्ट्रीय श्रमिक दिन घोषित करण्याची मागणी

सचिन शिंदे  मुंबई, १७ सप्टेंबर – भारतीय मजदूर संघाने (BMS) आज मागणी केली की १७…

1 month ago

डोंबिवली नागरी सहकारी बँकेला (DNS Bank) तिसऱ्यांदा सन्मान

सचिन शिंदे  मुंबई डोंबिवली नागरी सहकारी बँकेने (DNS Bank) सहकारी बँकिंग क्षेत्रात पुन्हा एकदा आपले…

1 month ago

दादरमध्ये ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव – ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन मुख्य आकर्षण

  मुंबई (प्रतिनिधी): दादर (प.) येथील ख्यातनाम ब्राह्मण सेवा मंडळाचा शतकोत्सवी गणेशोत्सव यंदा भव्यदिव्य आणि…

2 months ago