* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> आर्थिक मंदीचे संकेत रिझर्व्ह बँकेने आधीच ओळखले, म्हणून घटवले व्याजदर – मुंबई आसपास मराठी
व्यापार

आर्थिक मंदीचे संकेत रिझर्व्ह बँकेने आधीच ओळखले, म्हणून घटवले व्याजदर

मुंबई दि.१७ :- रिझर्व्ह बँकेने सलग पाच वेळा व्याजदर कपात केली. तरीही जून तिमाहीमध्ये आर्थिक वाढ ५ % व सप्टेंबर तिमाहीत ४.५ %वर आली. देशाच्या अर्थव्यवस्थेवर सूचना आणि आकड्यांच्या आधारावर चर्चा करण्याची गरज आहे. आर्थिक मंदी, महागाईतील वाढ, बँका व एनबीएफसीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँक आवश्यक ती पावले उचलेल असे ते म्हणाले. फेब्रुवारीतील व्याजदर कपातीच्या निर्णयामुळे बाजाराला धक्का बसला होता. आता व्याजदरात घटवण्याचा निर्णय घेतला धक्का बसला याचे आश्चर्य वाटते असे दास म्हणाले.

हेहि वाचा :- रिपाइं (इंदिसे) ची नागपुरात उग्र निदर्शने

सरकारच्या विविध प्रयत्नानंतरही आर्थिक मंदीचे रडगाणे कायम

दादास म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक व आर्थिक वाढीला चालना देणे महत्त्वाचे आहे. भारताने उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. निर्यातीला चालना मिळण्यासाठी त्यांनी भारतीय कंपन्यांना जागतिक पुरवठा साखळीचा भाग होण्यास सांगितले आहे, जेणेकरून निर्यातीला चालना मिळेल. सरकारकडून सप्टेंबरपासून सुधारणांचे अनेक प्रयत्न झाले. बँकिंग, रिअल इस्टेट व ऑटो क्षेत्राला दिलासा देण्याची घोषणा झाली. कॉर्पारेट करात कपात झाली. तरीही भक्कम सुधारणांचे संकेत दिसले नाहीत.

हेहि वाचा :- डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलमधून पडून तरुणीचा बळी

आर्थिक मंदीचे कारण फक्त जागतिक नाही

दास म्हणाले, देशातील आर्थिक मंदीचे कारण केवळ जागतिक नाही. यामध्ये स्थानिक समस्यांचाही वाटा आहे. ते म्हणाले, सरकार व रिझर्व्ह बँक दोघेही या समस्या दूर करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याला यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. दास असेही म्हणाले की, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुध्द थोडेफार शमल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थांना फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *