गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरुन सुरळीत विमानप्रवास सुविधा – रविंद्र चव्हाण
मुंबई दि.०१ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरुन सध्या सुरु असलेली विमान प्रवासाची सुविधा नियमित आणि अधिक फे-यांच्या स्वरुपात गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करुन दिली जाईल.
शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत
त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारकडे करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मंत्रायलयात पत्रकार परिषदेत दिली.
राज्यपालांच्या हस्ते डिजिटल ‘राजभवन पत्रिका’ पुस्तकाचे प्रकाशन
पर्यटन जिल्हा म्हणून महत्वपूर्ण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील रोजगार वृद्धी तसेच स्थानिकांच्या प्रवासाच्या सोयीच्यादृष्टीने चिपी विमानतळावरील विमानसेवा महत्वाची आहे. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला, असे चव्हाण यांनी सांगितले.