अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१९ :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.
हेही वाचा :- मुंबईतून सुमारे तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात परतीच्या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करावेत, जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे, पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी आणि त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.