Lok Sabha Election Voting Live: महाराष्ट्र पिछाडीवर; दुपारी 12 पर्यंत केवळ 17.21% मतदान
नवी दिल्ली दि.२९ – आज मतदान होत असलेल्या 71 पैकी 56 जागा सध्या भाजपा आणि मित्रपक्षांकडे आहेत. तर 2 जागा काँग्रेसकडे आहेत. आज महाराष्ट्रातील 17, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 13-13, पश्चिम बंगालमधील 8, मध्य प्रदेश आणि ओदिशातील प्रत्येकी 6-6, बिहारमधील 5 आणि झारखंडमधील 3 जागांवर आज मतदान होत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील एकूण 54 जागांवर आज मतदान होत आहे. यातील तब्बल 52 जागा सध्या भाजपाकडे आहेत. मात्र गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत भाजपानं या दोन्ही राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कौल देणारी ही राज्य काँग्रेसला ‘हात’ देणार की पुन्हा एकदा इथे ‘कमळ’ उमलणार हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. 9 राज्यांमधील 71 जागांवर थोड्याच वेळात मतदान सुरू होईल. भाजपा आणि मित्रपक्षांच्या दृष्टीनं चौथ्या टप्प्यातलं मतदान अतिशय महत्त्वाचं आहे. आज मतदान होत असलेल्या जागांपैकी सुमारे 67 टक्के जागा सध्या भाजपाकडे आहेत. त्या जागा राखणे ही भाजपाची प्राथमिकता आहे. त्याच वेळी गेल्या पाच वर्षांमध्ये बदललेल्या वातावरणाचा फायदा घेत, कॉँग्रेस, तसेच अन्य विरोधक भाजपच्या जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या उर्वरित टप्प्यांमध्ये होत असलेल्या जागांच्या निवडणुकीमधून देशात कोण सरकार स्थापन करणार, हे निश्चित होणार आहे.