कल्याण मध्ये “राष्ट्र कल्याण पार्टी” ची स्थापना
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार असून या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत कल्याण मधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कल्याण मध्ये राष्ट्र कल्याण पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. क
लोकसभा युवक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत हा पक्ष स्थापन केला केला आहे. या नवीन पक्षांच्या स्थापणेची घोषणा करण्या साठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत शैलेश तिवारी यांच्या बरोबर नुकताच युवक काँग्रेसच्या कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल काटकर, केडीएमसीच्या बहुजन समाज पार्टीच्या एकमेव नगरसेविका सोनी आहिरे, विश्व हिंदू परिषद कल्याण जिल्हा प्रमुख हर्षल साळवी, प्रदेश सह समन्वयक सेवादल काँग्रेस अनुपम तिवारी, विनय सिंह आदी जण यावेळी उपस्थित होते.
“राष्ट्र कल्याण पार्टी” च्या स्थापनेत इतर पक्षातील नाराज लोक असल्याचे दिसून आले. अनेक वर्षे काम करून देखील पक्षात सन्मान मिळत नसल्याने हे लोकं एका नविन पक्षाच्या बँनर खाली एकत्र आल्याचे या वेळी दिसून आले.
कल्याणात सुरवात करून अगोदर कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुक लढवून नंतर हळू हळू पक्ष पुढे घेऊन जाण्याचा मानस या वेळी शैलेश तिवारी यांनी व्यक्त केला. या वेळी बोलताना तिवारी यांनी सांगितले की राजकारणात फेस वँल्यू चालते महापालिका निवडणूकीत ८० टक्के फेस वँल्यू” असते तर २० टक्के पक्षाची मते असतात.
विधानसभेत ४० टक्के “फेस वँल्यू” चालते तर ६० टक्के पक्षाची मते असतात. लोकसभेत २० टक्के “फेस वँल्यू” चालते व ८० टक्के पक्षाची मते असतात असे ही त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे सर्व पक्षातील आजी माजी नगरसेवक आपल्या संपर्कात असून आगामी काळात ते देखील आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याचेही तिवारी यांनी सांगितले. दरम्यान या नवीन पक्षाचा प्रस्तापित पक्षांना किती फटका बसतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.