Dombivali ; पतंगाचा मांजा ठरला पक्षांसाठी कर्दनकाळ धारदार मांज्यामुळे घुबड रक्तबंबाळ
डोंबिवली दि.१८ :- पतंगाचा मांजा पक्षांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे डोंबिवलीतील एका घटनेतून समोर आले आहे. मांज्यात अडकलेले झाडाला लटकून एक घुबड मृत्यूची घटका मोजत होते. मात्र प्लांट अँड अनिमल्स वेलफेअर सोसायटीचे सदस्य कौस्तव भट्टाचारजी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन फायर ब्रिगेडच्या मदतीने मांजामध्ये अडकलेल्या घुबडाचा जीव वाचवला.
हेही वाचा :- Dombivali ; पुन्हा लोकलमधून पडून तरुण जखमी
मकरसंक्रांतीचे वेध लागले की आकाशात पतंग उडविण्यासाठी ठिकठिकाणी मुलांमध्ये स्पर्धा रंगते. पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला जातो. मात्र या खेळात पक्ष्यांच्या जीवाशीही खेळ खेळला जातो. एकीकडे पतंग उडवण्याचा आनंद साजरा होत असतानाच या पतंगांसाठी वापरण्यात येणारा मांजा (दोरा) हा अनेक वेळा पक्षांच्या जीवावर बेतणारा ठरतो. या धारदार मांज्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागला आहे. पक्षांना इजा पोहविण्याचा कोणाचाही उद्देश व हेतू नसतो, अगर कुणीही जाणूनबुजून करत नाही.
हेही वाचा :- ४० वी राष्ट्रीय मास्टर्स अॉथलेटीक्स चांम्पीयन शीप संपन्न
परंतु स्पर्धेमध्ये आकाशात लांब गेलेल्या पतंगाच्या मांज्यामध्ये आकाशात भराऱ्या मारणारे पक्षी अडकून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. ऑक्टोबर महिन्यापासूनच छुप्या पध्दतीने नायलॉन मांजाची विक्री झाल्याने यंदाही पाखरांच्या जीवावर संक्रांत ओढावली. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांज्यामध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होत असल्याच्या घटना घडत असतात.
हेही वाचा :- सर्वात जास्त राग कुणाचा येतो? राज ठाकरे की नारायण राणे? आदित्य ठाकरे म्हणतात…
असाच प्रकार डोंबिवलीच्या आयरे गावाजवळ घडला. पतंगाच्या मांज्यामुळे एक घुबड जखमी झाले. एक घुबड सकाळपासून मांज्याला अडकून झाडाला लटकत होते. ही माहिती कळताच प्लांट अँड अनिमल्स वेलफेअर सोसायटीचे सदस्य कौस्तव भट्टाचारजी यांची घटनास्थळी धाव घेत लगेच फायरब्रिगेड कॉल करून बोलवून घेतले. अखेर त्याला फायरब्रिगेड जवानांनी खाली काढले आणि त्याचा जीव वाचवला.
हेही वाचा :- मेडीक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेत कल्याणच्या डॉ. अस्मिता कुकडे ठरल्या एक्सलंट ऑरेटोर
मांज्यामुळे शहरात दरवर्षी जवळपास एक हजारांहून अधिक पक्षी जखमी होतात. त्यातील तीनशे पक्षी विविध अनाथालयात नागरिकांमार्फत दाखल केले जातात. दरवर्षी दोनशेहून अधिक पक्ष्यांचा या कारणामुळे मृत्यू होतो. पक्ष्यांच्या चोचीने चिनी नायलॉन मांजा तुटत नसल्यामुळे तो जीवघेणा ठरत आहे. मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांचे पाय, पंख कापले जातात, परिणामी काही पक्ष्यांना कायमस्वरूपी अपंगत्व येते. पक्ष्यांच्या मानेभोवती मांजा अडकल्याने त्यांच्या मानेलाही गंभीर दुखापत होत आहे. अनाथालयाबरोबरच पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांकडेही नागरिक जखमी पक्ष्यांना घेऊन जातात. ही संख्याही लक्षणीय असल्याचे पॉज संस्थेचे संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले. आमच्या सारख्या संस्था नेहमीच फिल्डवर्कमध्ये सक्रिय असतात. परंतु हिंदू धर्म आणि त्यातील श्रध्दा बाळगणारे लोक आमची नेहमी चेष्टा करतात की अश्या संस्था फक्त हिंदू सण असले जी जागरूक असतात. परंतु बाकी धर्मातील सणामुळे जेवढे पक्षी मरत नाहीत तेवढे पक्षी घायाळ होतात आणि मांजा अडकून मरतात हे आजही सिद्ध झाले असल्याचे भणगे यांनी सांगितले.