ठळक बातम्या

प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे तरहिंदूंच्या अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र – अधिवक्ता सतीश देशपांडे यांचे प्रतिपादन

मुंबई, दि. २५
कत्तलखाने आणि कारखाने यांमुळे प्रदूषण होते, हे गोदावरी, यमुना आदी अनेक नद्यांविषयी सरकारनेच दिलेल्या अहवालांतून स्पष्ट झाले आहे; मात्र गणेशोत्सवामुळे प्रदूषण होते, याची अधिकृत माहिती, आकडेवारी सुद्धा कोणाकडे नाही. मग गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होते, हे कोणत्या आधारावर म्हटले जाते ? गणेशोत्सवच नव्हे, तर हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांवर विविध बंधने आणायचे हे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन इतिहास आणि संस्कृती अभ्यासक, अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी नुकतेच केले.
हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘गणेशोत्सवामुळे जलप्रदूषण होते का?’या विषयावरील विशेष ऑनलाईन संवादात ते बोलत होेते.
गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे प्रदूषण होत नाही, हे हिंदूंनी लक्षात घेऊन हिंदूंनी याविषयी आवाज उठवून जनजागृती केली पाहिजे, असे आवाहनही देशपांडे यांनी केले.
कोल्हापूर येथील ‘हिंदू एकता आंदोलना’चे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई म्हणाले, वाहात्या पाण्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केले पाहिजे अशी हिंदू धर्मात परंपरा आहे; मात्र आज वाहत्या पाण्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यास पोलीस, प्रशासनाकड़ून विरोध केला जातो. हा विरोध कोणत्या आधारावर, न्यायालयाच्या कोणत्या आदेशानुसार केला जातो? याविषयी पोलीस-प्रशासनाकडे योग्य उत्तर नाही. कोल्हापूर येथील पंचगंगा नदीमध्ये सहा ते सात नाल्यांचे आणि कारखान्यांचे पाणी सोडले जाते, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही; मात्र गणेशोत्सव आला की, हे प्रदूषणाच्या नावाखाली जागे होतात. हिंदूंच्या प्रथा-परंपरा बंद करण्यासाठी हे सर्व केले जात आहे‌
गणेशोत्सवात प्रदूषण होते, असा भ्रम नागरिकांमध्ये तथाकथित पर्यावरणवादी, विज्ञानवादी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले निर्माण करत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्च २०२३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तिकेत सर्वांत हानीकारक प्रदूषित नद्यांमध्ये मुंबईतील मिठी नदी, नागपूरमधील कन्हान नदी, पुण्यातील मुळा-मुठा नद्या यांचा उल्लेख केला होता. मार्चमध्ये तर गणेशोत्सव नव्हता, तर मग हे कोणते प्रदूषण होते ? कारखाने, कत्तलखाने यांच्यामुळे वर्षभर होणारे प्रदूषण त्याविषयी आवाज न उठवणारे विज्ञानवादी, सेलिब्रिटी गणेशोत्सवात प्रदूषण होते, याविषयी बोलतांना दिसतात. कारखाने आणि कत्तलखाने यांच्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी यांनी काही केले आहे का ? गेली दहा, बारा वर्षे कृत्रिम तलाव तयार करण्यात आल्यापासून किती प्रदूषण कमी झाले आहे, असे सरकार आकडेवारीसह जाहीर करेल का ? असे प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते सतीश कोचरेकर यांनी उपस्थित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *