वाहतूक दळणवळण

मध्य रेल्वेवरील १५ स्थानकांचा कायापालट होणार

मुंबई दि.०४ :- मध्य रेल्वेवरील १५ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक’ या योजनेअंतर्गत हा विकास करण्यात येणार आहे.

भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुंब्रा, दिवा, टिटवाळा, शहाड, इगतपुरी,
वडाळा स्थानकांचा या योजनेत समावेश आहे.

स्थानक प्रवेशद्वाराची लांबी-रुंदी वाढवणे, स्थानकाच्या दर्शनी भागाची, वर्दळीच्या परिसरात तसेच फलाटावरील छतामध्ये सुधारणा, नवीन प्रसाधनगृह, फलाटावर प्रवाशांना बसण्याची व्यवस्था, स्थानकातील नामफलक इत्यादी बदल करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *