लवकरच डोंबिवली प्रदूषणमुक्त होणार …
दोन्ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अद्ययावत करण्याचा निर्णय …
डोंबिवली दि.११ – प्रदूषणाबाबत डोंबिवलीचा राज्यात दुसरा क्रमांक लागतो. मात्र आता डोंबिवलीकरांची प्रदुषणापासून सुटका होणार आहे. डोंबिवलीतील औद्योगिक विभागामुळे प्रदुषणाचा त्रास नागरिकांना होत असून यापासून सुटका करण्यासाठी रासायनिक उद्योग अयंत्र हलवण्यात यावेत अशी मागणी होत असताना औद्योगिक विकास महामंडळ, प्रदुषण नियंत्रण मंडळानी एकत्र येऊन फेज १ व २ मधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढवून ते अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे ९५ कोटी रुपये खर्च होणार आहे.
डोंबिवली औद्योगिक विभागातील फेज एक मध्ये व दोन मध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्र असून ती अपुरी ठरत आहेत. हे प्रदुषीत पाणी नाल्यात सोडण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याच्या वांरवार तक्रारी येत असतात मध्यंतरी काही कंपन्या हरित लवादाने बंद करण्याचे निर्देश दिले होते
त्यामुळे उद्योजकांनी वर्गणी गोळा करुन सांडपाणी प्रक्रिया केंद्राची दुरुस्ती काही प्रमाणात केली होती. मात्र हे पुरेसे नसल्याने दोन्ही सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अद्ययावत करण्याचा निर्णय औद्योगिक विकास महामंडळाच्या डोंबिवली विभागाने घेतला असून यासाठी सुमारे ९५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे एका अधिकार्याने सांगीतले.
या कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सीएच टु एम या निमंत्रकाला देण्यात आले असून हे काम करण्यासाठी ठेकेदार नेमण्यात येणार असल्याचे त्या अधिकार्याने सांगितले. यासाठी अपेक्षित खर्च ९५ लाख रुपये असले तरी यात वाढ होण्याची शक्यता असल्याचेही त्यानी सांगीतले. ठेकेदाराला हे काम देण्यासोबतच त्याला पाच वर्षे सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवण्यास देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. तसेच खंबालपाडा येथील नाल्यात सोडण्यात येणारे सांडपाणी बंदिस्त पाईपलाईनमार्फत मुंब्रा येथील खाडीत सोडण्यात येणार असून यासाठी पाईपलाईन टाकण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याची योजना असून टेंडर प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.