महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे रोखली
परभणी – रेल्वेस्थानकावरील कँटीनमधून अव्वाच्या सव्वा दराने खाद्य पदार्थ विक्री होतात़ ५ रुपयांचा चहा १० रुपयांना, १५ रुपयांची पाणी बॉटल २० रुपयांना विक्री केली जात आहे़ तेव्हा रेल्वे प्रशासनाने सेलू येथील कँटीनचे टेंडर रद्द करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आंदोलन करण्यात आले़ आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष शेख राज, रुपेश सोनटक्के, सचिन पाटील, सुशीलताई चव्हाण, अनिल बुचाले, अर्जुन टाक, गुलाबराव रोडगे, गणेश नेवाळकर, सय्यद जावेद, प्रभूराज तेवर, शेख यास्मीन, दिलीप डहाळे, कृष्णा कदम, राजेश यादव, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते़. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक रेल्वे रोखो आंदोलन केल्याने रेल्वेतील प्रवाशांना काय झाले हेच कळाले नाही़ यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या अधिका-यांच्या निदर्शनास दरवाढीची बाब आणून दिली़ या घटनेची रेल्वे पोलिसात नोंद झाली नव्हती़.