मराठवाडा,विदर्भाला गारपिटीचा तडाखा, तिघांचा गारपिटीमुळे मृत्यू
(म.विजय)
विदर्भ- मराठवाडा आणि विदर्भाला जोरदार गारपिटीचा तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जालन्यातील वंजार उमरद गावातील ७० वर्षीय नामदेव शिंदे यांचा गारा अंगावर पडून मृत्यू झाला. जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा इथले ६० वर्षीय वृद्ध आसाराम गणपत जगताप यांचा मृत्यु झालाय तर वाशिममध्ये महागाव येथे यमुना हुंबाड या महिलेचा दुर्दैवी अंत झाला असून, आणखी एक महिला जखमी आहे.
अकोल्यातल्या बाळापूर तालुक्यातील अंदुरा आणि परिसरात सकाळी ७:३० दरम्यान विजेच्या कडकडासह पाऊस झाला. त्याचवेळेस गारपीटही सुरु झाली. गारपिटीमुळे कांदा , गहू, हरभरा पिकाचे नुकसानीची शक्यता आहे.
गेल्या चार दिवसांपासून जालना जिल्ह्याभरात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने गारपीटीसह पाऊस होण्याचा शारा देखील दिला होता. आज रविवारी भल्या पहाटे जालना शहरासह जिल्ह्यातील काही भागात तसेच मंठा तालुक्यात आज सकाळी ७ ते ८ वाजेपर्यन्त १ तास गारपीटीसह जोरदार पाऊस झाला आहे