नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला
(श्रीराम कांदू)
नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आला आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली. ठाणे जिल्हयातील सर्व मतदारांनी व विशेषत: 18 ते 21 वयोगटातील तरुणांनी, नवविवाहीत महिलांनी आपले नाव मतदार यादीत आहे किवा नाही याची खात्री करुन जर मतदार यादीत नाव नसेल तर दिनांक 15 डिसेंबर 2017 पर्यंत आपले नावाची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात यावी असे याव्दारे जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे जिल्हा यांचेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 01.01.2018 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता दिनांक 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत या जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी 15 डिसेंबर, 2017 पर्यंत वाढविला आहे.
सदर कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी व्हावी, मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता दिनांक 15 डिसेंबर 2017 पर्यंत या जिल्हयातील 18 विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी नविन नाव नोंदणी व स्थलांतरित , मयत मतदारांची वगळणी बाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे