तिन्ही मुली झाल्याने महिलेचा मानसिक व शारीरिक छळ
नकोशीच्या आईला जाच कायम
कल्याण – एकीकडे सरकारकडून महिला सक्षमी करण ,महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु असून बेटी बचाव बेटी पढाव अभियान राबवण्यात येत आहे तर दुसरी कडे आज काही महिलांना मुलीना जन्म दिल्याने कुटुंबाकडून शारीरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .अशीच एका कल्याण मध्ये घडली आहे .लागोपाठ तिन्ही मुली झाल्याने एका महिलेला तिचा पती सासू सास-यांंच्या जाचाला सामोरे लागले या प्रकरणी त्रस्त महिलेने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसनी पती शिवपूजन मिश्रा उर्फ धीरज मिश्रा ,गीता मिश्रा ,सासरे दिनानाथ मिश्रा नणंद नीतू दुबे , पारस दुबे विरोधात गुन्हा दखल केला आहे .
विरार पूर्व येथे राहणा-या सदर महिलेचे २०११ साली कल्याण पूर्वेकडील चक्की नाका परिसरात राहणर्या शिवपूजन मिश्रा यांच्याशी विवाह झाला होता .मात्र त्यानंतर सदर महिलेला लागोपाठ तिन्ही मुली झाल्याने पती शिवपूजन मिश्रा उर्फ धीरज मिश्रा ,गीता मिश्रा ,सासरे दिनानाथ मिश्रा नणंद नीतू दुबे , पारस दुबे यांनी या महिलेला मारहाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तसेच तिचा सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केला .अखेर या जाचाला कंटाळून या महिलेने या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलीसानी पती शिवपूजन मिश्रा उर्फ धीरज मिश्रा ,गीता मिश्रा ,सासरे दिनानाथ मिश्रा नणंद नीतू दुबे , पारस दुबे विरोधात गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे .