कल्याण मधील रस्ता अपघाती मृत्यू प्रकरण अपघात झालेल्या ठिकाणची आमदार नरेंद्र पवार आणि शिवसेना पदाधिकारी यांनी केली पाहणी..
(श्रीराम कांदु)
कल्याण दि.०८ – पश्चिमेतील शिवाजी चौकात उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात काल मनीषा भोईर या महिलेचा मृत्यू झाला होता. आज दुपारी कल्याण पाश्चिम चे आमदार नरेंद्र पवार आणि शिवसेना पदाधिकारी यांनी अपघात झालेल्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी MSRDC चे कन्सल्टंट लोकेश कानतोडे आणि महापालिका अधिकारीही उपस्थित होते. आमदार पवार यांनी सम्पूर्ण रस्त्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकारीही या पाहणी दरम्यान पवार यांच्या सोबत होते. मागील महिन्याभरात त्याच ठिकाणी दोन जणांचा मृत्यू झाल्याने आमदार पवार यांनी संताप व्यक्त केला. जून महिन्यात झालेल्या अपघातात आरोह या मुलाच्या मृत्यूनंतर आमदार नरेंद्र पवार यांनी महापालिका आणि MSRDC अधिकाऱ्यांकडे या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा त्याच ठिकाणी अपघात होऊन महिलेला जीव गमवावा लागला. यामुळे संतप्त झालेल्या आमदार नरेंद्र पवार यांनी या प्रकरणी महापालिकेचे शहर अभियंता आणि MSRDC चे सबंधित अधिकारी याना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.तसेच विधानसभेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.