कल्याणमध्ये रसायनमिश्रित विहिरीत बुडून पाच जणांचा मृत्यू
कल्याण मधील नेतेवली येथे साफसफाई करण्यासाठी विहिरीत उतरलेले 5 कामगारांचा मृत्यू झाला असून रसायन मिश्रीत विहिरीत साफसफाई साठी एक सफाई कामगार उतरला होता त्यानंतर तो बराच वेळ विहिरीत बाहेर न आल्याने दोन स्थानिक नागरिक सफाई कामगाराला वाचवायला विहिरीत उतरले मात्र तिघेही बाहेर आले नाही आणि अथवा त्यांचा पत्ता लागेना नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी पाचारण करावे लागले अग्निशामक दलाचे प्रमोद वाकचौरे आणि अनंत शेलार दोन जवान उतरले मात्र ते देखील बाहेर आले नाही.
त्यानंतर पाचही जण बुडाल्याची बातमी परिसरात वार्यासारखी पसरली आणि घटनास्थळी गर्दी जमा झाली ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली घटनास्थळी पोलिस व अग्निशामक दलाचे शोध मोहीम राबवत असताना पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली घटनास्थळी मदतीसाठी NDRF, TDRF आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाची मदत पाठवण्यात आले आहे पाचही नृत्य बाहेर काढण्यात आले असून अग्निशमन दलाचे जवान अनंत शेलार प्रमोद वाकचौरे राहुल गोस्वामी मुलगा आणि गुणाबाई गोस्वामी वडील यांचे वृद्ध सापडले असून अनेक मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.