अपघातात दोन कॉलेजचे विद्यार्थी ठार ;टेंपोचालकाला अटक
मुंबई-टेम्पोने दिलेल्या धडकेत कॉलेजचे दोन विद्यार्थी मृत झाल्याची घटना नुकतीच घडली.मनीष किशोर ठाकुर (२१) व वेदान्त अनिल नार्वेकर (२१) अशी या विथार्थ्यांची नावे असून शनिवारी रात्री मोटरसायकलने घरी जाताना कीर्ति कॉलेज जंक्शन येथे एका भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी दादर पोलिसांनी टेंपोचालक जयराम यादव याला अटक केली आहे.
Please follow and like us: