‘..ही तर महाराष्ट्राशी गद्दारी’, हेगडेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊत संतापले
मुंबई दि.०२ :- भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. केंद्र सरकारचा ४० हजार कोटी निधी वाचविण्यासाठी महाराष्ट्रात फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, असा दावा हेगडे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ही महाराष्ट्राशी गद्दारी आहे, असे ट्विट करत राऊत यांनी निशाणा साधला आहे. हेगडे यांनी केलेल्या दाव्याचा संदर्भ देत राऊत यांनी हा महाराष्ट्राशी विश्वासघात असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा :- मोबाईल तपासण्यास मागितला भडकलेल्या पत्नीने घेतला पतीला चावा पतीची पोलिस ठाण्यात धाव
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देण्यात आलेले ४० हजार कोटी केंद्राला परत पाठवण्यासाठी ८० तासांचे मुख्यमंत्री बनले होते का ? असा अनंतकुमार हेगडे यांच्या दाव्याचा दाखला देत संजय राऊत यांनी सवाल केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केले आहे.
Bjp mp @AnantkumarH says @Dev_Fadanvis as CM for 80 hours, moved maharashtra's 40000 cr Rs to center ? This is treachery with maharshtra , महाराष्ट्र के साथ गद्दारी है @Officeof UT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 2, 2019
दुसरीकडे नवाब मलिक यांनीही भाजपवर टीका केली. या दाव्यात तथ्य असेल तर हा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांवरही अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले. हे ठरवून केलेले नाटक होते. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी १५ तासांच्या आत ४० हजार कोटी रुपये वेगवेगळ्या माध्यमातून केंद्राकडे परत पाठवले, असा दावा अनंतकुमार हेगडे यांनी केला आहे.