मोबाईल तोडल्याचा आरोप करून लुबाडले
डोंबिवली दि.२३ :- मुंबईतील मालाड येथे राहणारे इरफान चारोलिया हे रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कल्याणच्या वल्लीपिर चौक येथून जात होते. धक्का लागून मोबाईल पडल्याच्या बहाण्याने ३ इसमांनी त्यांना हटकले. पडल्यामुळे मोबाईलची स्क्रीन खराब झाल्याने मोबाईल दुरुस्त करून देण्याची जबरदस्ती करत मारहाण केली.
हेही वाचा :- अमितच्या निवडीने आश्चर्य अन् अत्यानंद, ‘राज’पुत्राला मायेचा प्रेमळ सल्ला
इरफान यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून त्यांना उल्हासनगर येथे घेऊन गेले व तेथे जबरदस्तीने त्यांच्या एटीएम कार्डचे पिन घेऊन एका दुकानातून ३२ हाजारांचे मोबाईल खरेदी केले. इतकेच नाही तर एका बारमधून बियर विकत घेऊन इरफान यांना विठ्ठलवाडी स्टेशन जवळ सोडून दिले. या प्रकरणी इरफान यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी फरार भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.