उरण मधील मच्छीमारांवर बरोजगारीचे संकट, मच्छीमारांचा स्थलांतरास विरोध
उरण दि 16 (विठ्ठल ममताबादे) छत्रपती शिवाजी महाराज मंडई, म.न.पा, मुंबई मधील मच्छीविक्रेत्या कोळी महिलांचा ऐरोली नाका येथे जाण्यास ठाम विरोध आणि आहे त्याच ठिकाणी अध्ययावत मार्केटची उभारणी करणे या विषयावर अखिल मच्छिमार कृती समितीचे नेते दामोदर तांडेल आणि उरण सामजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती.
सदर मच्छी विक्रेते हे गेली 50 वर्षे वर्षाचे बाराही महिने पहाटे 3 वाजल्या पासून मध्यरात्री पासून प्रत्यक्ष मेहनत करतात तेव्हा कुठेतरी त्यांच्या कुटूंबाचे पालन पोषण या व्यवसायामुळे होत आहे.सदर मच्छी विक्रेते यांना सदर मार्केट 50 वर्षांनंतर कोणताही अभ्यास अथवा विचार न करता ऐरोली येथे स्थलांतरित करणे बाबत नोटीस देऊन मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण करून या मासळी विक्रेत्या महिलांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा मनपा, मुंबई यांनी घेतल्याचा दिसून येत आहे. नोटीस मधील विषयात “तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करणेबाबत” असे नमूद करून मूळ नोटीस मध्ये “कायमस्वरूपी जागा मिळण्यासापेक्ष स्थलांतरित” असा शब्दप्रयोग केला आहे.त्यामुळे येथे कोळी महिलांचा कौटुंबिक उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे . बहुतांश महिलांचा याच उत्पन्नावर पूर्ण कुटुंब अवलंबून आहे. असे असून मनपा मुंबई, शब्दप्रयोग करून कोळी महिलांना मुंबई हार्बर (सामुद्रिक पट्टा) च्या हद्दपार करत आहेत.
दि. 31/7/2019 पर्यंत प्रश्न नाही सुटला तर कुटूंबासह दि. 1 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा कोळी समाज बांधवांनी दिला आहे.
वर्षोनुवर्षे कोळी महिला घाऊक मच्छी विक्रेत्यांकडून तर कधी ससून गोदी कुलाबा आणि कसारा गोदी भाऊचा धक्का येथून मासळी विकत घेतात आणि ती किरकोळ पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज मनपा मंडई मुंबई येथे विक्री करतात. मुंबई मधील वैयक्तीक ग्राहक, छोट्या पासून ते मोठमोठे हॉटेल आणि कंपन्यांतील ग्राहक असे येथील मुख्य ग्राहक आहेत. वर्षोनुवर्षे हे मच्छीमार बांधव आणि महिला मासळी विक्रेत्या येथे उदरनिर्वाह करत आहेत
सदर नोटीस मच्छीमार,कोळी बांधवांना पाठविण्याआधी आयुक्त मनपा मुंबई, सर्व संबंधित अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज मनपा मंडई येथील घाऊक मच्छी विक्रेते, किरकोळ पद्धतीने मासळी विक्रेत्या कोळी महिला आणि विविध मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जॉईंट बैठक लावून सदर बाबतीत सुनावणी घेऊन सर्वांना सोयीचे होईल असे निर्णय घेतले जावे अशी मागणी उपस्थित सर्व मार्गदर्शकांनी केली आहे. अन्यथा दिनांक 1/8/2019 रोजी सर्व बाधित मासळी विक्रेत्या आणि ईतर या व्यवसायावर अवलंबून आसणारे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
सदर मिटिंगला मच्छिमार नेते दामोदर तांडेल , संतोष पवार , अॅड. कमळाकर तांडेल, मिलिंद वैद्य , अॅड हसन पटेल , श्रीमती नैना पाटील , राकेश कोळी , उप शाखा प्रमूख महम्मद शकील कुरेशी , गणेश तांडेल, प्रफूल भोईर आदि मान्यवर उपस्थित होते.