विकासाच्या मुद्द्यावर लढली जात आहे निवडणूक !
डोंबिवली :- दि. ०९ ( प्रतिनिधी )
ठाणे जिल्हा परिषद आणि कल्याण पंचायत समितिच्या सार्वत्रिक स निवडनुकीचे वारे जोरदार वाहत असले तरी विकासाच्या मुद्यावत निवडणूका लढल्या जात आहेत. निवडणूक काही ठिकाणी जरी बिनविरोध होत असली तरी खरी लढत शिवसेना आणि भाजपा मधेच होत आहे. डोंबिवली ग्रामीण विभागात प्रचार फेरीवर दोन्ही पक्षांनी भर दिला असून ग्रामीण विभागातील विकास हाच मुद्दा अधिरोखीत केला जात आहे.
खोणी गटातून जिल्हा परिषदेसाठी भाजपा-आरपीआय (आठवले गटाचे) लक्ष्मण बाळकृष्ण पाटील, शिवसेनेचे रमेश पाटील, राष्ट्रवादीचे मोतीराम गोंधळी तर पिंपरी व खोणी गणातून भाजपा-आरपीआय (आठवले गटाचे) सुनील पांडुरंग म्हसकर, संदेश सुरेश ठाकरे शिवसेनेचे भारत भोईर, किरण ठोंबरे, राष्ट्रवादिचे गुरुनाथ वालीलकर, सावन सावंत अशी बलाबल होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून जि. व पं.स. च्या निवडणूक प्रचाराला वेग आला असून बाळेगाव, गणेशमंदिर, वाकलन, भार्मली, निघू, नेवाळी, दहिसर, नागाव, पिंपरी, दहिसरमोरी, भंडार्ली आदी 19 गावातून जिल्हा परिषदेच्या खोणी गटातून भाजपा-आरपीआय (आठवले गटाचे) उमेदवार लक्ष्मन पाटील आणि पिंपरीचे उमेदवार सुनील म्हसकर गावागावात भेटी दिल्या. गेली २५ वर्षांपासून मुलभूत विकास होत नसल्याची तक्रार दोन्ही उमेदवारांनी केली. पालकमंत्री, खासदार, आमदार शिवसेनेचे असताना रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण याबाबत लक्ष दिले गेले नाही. पाणी समस्या दोन-तीन महिन्यात सुटले अशी खोटी आश्वासने देत असल्याचे त्यांनी सांगितले. आमचं प्रथम प्राधान्ये १४ गावातील रस्ते एकमेकांना जोडले जावेत. पाण्याची समस्या तत्काळ सोडविली जाईल. खोणी गट आणि गणात निवडणुका लढवू नये असं ग्रामस्थांचा मतप्रवाह असताना ज्येष्ठ नेत्यांच्या बालेकिल्लाच्या हट्टामुळे निवडणुका लढविण्याची वेळ आली आहे असे वक्तव लक्ष्मण पाटील यांनी केले. तर सुनील म्हसकर म्हणाले पाण्याची समस्या सोडविण्यावर जास्त भर देणार आहे.