१५ मार्चला मुंबईत फेरीवाल्याचा मोर्चा
डोंबिवली नाशिक येथील आदिवासी व शेतकरी यांच्या अभूतपूर्व लॉंग मार्चला मिळालेल्या यशानंतर आता महाराष्ट्रातील फेरीवाले येत्या १५ मार्चला प्रचंड मोर्चा मंत्रालयावर नेणार आहेत.
डोंबवली कस्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी वरील माहिती दिली १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदानात महाराष्ट्रातील फेरीवाले एकत्र येणार असून शहर फेरीवाला शहर समिती स्थापन करा ,फेरीवाल्यांना हक्क व सन्मान द्या ,फेरीवाल्यांवर कारवाई थांबवा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.