भाजप सरकारच्या विरोधात कोंग्रेसचा बैलगाडी मोर्चा
श्रीराम कांदु
डोंबिवली : पेट्रोल, डिझेल दरवाढ, बेरोजगारी, जी.एस.टी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंदर्भात भाजप सरकारविरोधात कल्याणात काँग्रेसने बैलगाडी मोर्चा काढन्यात आला होता .
हा मोर्चा सहजानंद चौक ते कल्याण तहसिल कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. .यावेळी आमदार संजय दत्त, प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त, कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी झाले होते .यावेळी काँग्रेसने सरकारची धोरणं आणि कायदे सामान्य जनतेविरोधात असल्याचा आरोप करत भाजप सरकारचा निषेध केला .याबाबत आमदार संजय दत्त यांनी भाजप च्या धोरणांचा निषेध केला तर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी इंधन दरवाढी मुळे महागाई मोठ्या प्रमानात वाढली आहे परिणामी सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे गेल्या वर्षभरात गॅस च्या किमती 19 वेळा वाढल्या आहेत इंधनावर वट सह विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत पेट्रोल डिझेल वर दुष्काळ कराच्या नावाखाली कर लावून लूट सूरु आहे असा आरोप केला तसेच सरकारने पेट्रोल डिझेलचा जीएसटी मध्ये अंतर्भूत करून सर्वसमान्यांना दिलासा द्यावा ,शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,पेट्रोल, डिझेल ,गॅस यांची दरवाढ कमी करावी या मागन्याचे निवेदन तहसीलदाराणा देण्यात आले आहे या मागण्या सरकारने मान्य न केल्यास काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे .