बारवी धरण विस्थापितातील १२०४ पैकी ४ ६० बाधितांना नोकरी मिळणार
डोंबिवली,ता १३- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले असून तोडली गावाचे शंभर टक्के पुनर्वसन रखडले आहे या भागातील ५ गावे व ६ संलग्न पाडे बाधित होत असून यातील १२०४ पैकी ४६० बाधितांना स्थानिक स्वराज्य संस्थात नोकरी मिळणार आहे तर उरलेल्या ७४४ जणांना आर्थिक लाभ मिळणार आहे .
पाण्याची वाढती मागणी व भविष्यातील गरज लक्षात घेऊन महामंडळाने १९९८ साली धरणाची उंची वाढवण्याचे तिस-या टप्प्याचे काम हाती घेतले हे काम पूर्ण झाल्यावर धरणाची उंची तीन मीटरने वाढवण्यात आली असून धरणाच्या पाणीसाठयात १८१ द ल लि वरुन २४० द ल लि म्हणजे ६० द ल लि इतके म्हणजे ४० टक्के पाणीसाठा वाढला आहे.
प्रकल्पग्रस्तांनी कुटुंबातील प्रत्येक एका कुटुंबातील नोंकरी देण्याची मागणी केली आहे यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाना वाढीव पाणीसाठा देण्यात येणार आहे त्यानी नोकरी द्यावी असा प्रस्ताव नियोजन समितीत मंजूर करण्यात आला.यामध्ये ठाणे,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर,भिवंडी,नवी मुंबई,अंबरनाथ,ग्रमीण भाग,औद्योगिक क्षेत्र यांना पाणी पुरवठा करण्यात येतो.विस्थापितांना नोकरी देण्यासंदर्भात सध्या नियोजन सुरु असून एकूण १२०४ विस्थापितांपैकी ४६० जणांना लिहीता वाचता येत असल्याने त्याना स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरी देण्यात येणार असून इतरांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने नाव न देण्याच्या अटीवर सांगीतले.