राहुल गांधी यांची पत्रकार परिषद् अवघ्या दीड मिनिटांत संपली,पंतप्रधान मोदी,भाजप व आरएसएसवर टीका
महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. अवघ्या दीड मिनिटांच्या पत्रकार परिषदेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.सकाळी साडेआठ वाजता ही पत्रकार परिषद नियोजित होती. मात्र ती सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुरु झाली आणि 9.22 पूर्वीच संपली. म्हणजेच दीड मिनिटांच्या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांना जवळपास 50 मिनिटे वाट पाहावी लागली.