मुंबईत पोलीस भरती साठी आलेल्या चार तरुणींना कारने उडवले
मुंबई: मुंबईत पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी पूर्ण करून विक्रोळी स्थानकाकडे जात असताना चार तरुणींना कारने उडवले. हि घटना आज सकाळी ११ वाजता पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विक्रोळी स्थानकाकडे जाताना घडली.
काजल करडे, दीपाली काळे, चित्राली पांगे, चैताली दोर्गे अशी या तरुणींची नावं आहेत.या चारी तरुणीं पुण्याच्या शिरुरमध्ये असलेल्या शिरोळे अकादमीच्या आहेत.
रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने त्यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना विक्रोळी येथील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.चित्राली पांगे हिने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कारचालकास अटक करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याच्यावर योग्यती करवाई करण्यात आली.